नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी संघर्ष थांबला असला तरी, खबरदारीचा उपाय म्हणून रविवारी रात्री राजस्तानच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे ब्लॅकआउट पाळण्यात आला. दरम्यान, बाडमेरमध्ये आकाशात काही लाल दिवे दिसले. ते ड्रोनचे असल्याचा संशय आहे. सीमावर्ती भागातील जिल्ह्यांमध्ये ब्लॅकआउटच्या वेळा वेगवेगळ्या होत्या. जैसलमेरमध्ये सायंकाळी ७:३० ते सकाळी ६, बिकानेरमध्ये सांय. ७ ते सकाळी ५, गंगानगरमध्ये सायंकाळी ७ ते सूर्योदय होईपर्यंत आणि बारमेरमध्ये रात्री ८ ते सकाळी ६ पर्यंत वीजपुरवठा बंद होता. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून सीमावर्ती भागातील शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या. भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दल सतर्क आहेत, असे गृह विभागाच्या अधिकार्याने सांगितले.
Fans
Followers